महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीतील पीडितांना अद्याप नुकसान भरपाई नाहीच   

न्यायालयाने योगी सरकारला फटकारले 

लखनऊ : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यास झालेल्या विलंबाबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या सुट्टीतील खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले आहेत.उदय प्रताप सिंह यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सौमित्र दयाल सिंह आणि संदीप जैन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे, की सरकारने भरपाई जाहीर केल्यानंतर ती वेळेत पीडितांपर्यंत पोहोचवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन न करता चेंगराचेंगरीतील पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आल्याबद्दलही न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
 
राज्य सरकारच्या अधिकार्‍यांनी ५ फेब्रुवारी रोजी अर्जकर्त्याच्या पत्नीचा मृतदेह त्याच्या मुलाला सोपवल्याचे दिसून येते. चार महिने उलटून गेले तरी राज्य सरकारने जाहीर केलेल्या भरपाईचा कोणताही भाग अर्जकर्त्याला देण्यात आलेला नाही. हे चिंताजनक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.यावर सरकारच्या वकिलांनी असे नमूद केले, की अर्जकर्त्याने भरपाई मिळावी याबाबतचा कोणताही दावा केलेला नसल्यामुळे त्यावर अद्याप विचार करण्यात आलेला नाही.
सरकारची 

असंवेदनशील भूमिका 

न्यायालयाने म्हटले, की प्रथमदर्शनी, आम्हाला तुम्ही घेतलेली भूमिका असमर्थनीय वाटते आणि ती नागरिकांच्या दुर्दशेबद्दल असंवेदनशीलतेची भावना निर्माण करते. पीडित कुटुंबांना अत्यंत सन्मानाने भरपाई देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. राज्य हे आपल्या नागरिकांचे विश्वस्त आहे. 
 

Related Articles